लातूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपले
लातूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।लातूर शहर आणि जिल्ह्या मध्ये मुसळधार पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे .बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडाली. अतिवृष्टीच्या संकटानंतर पुन्हा एकदा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्य
लातूर पाऊस


लातूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।लातूर शहर आणि जिल्ह्या मध्ये मुसळधार पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे .बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडाली. अतिवृष्टीच्या संकटानंतर पुन्हा एकदा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळली आहे.लातूर उदगीर निलंगा औसा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे .उदगीर तालुक्यात सकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

पाऊस, अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या नुकसानीतून सावरत असलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पावसाचे मोठे संकट कोसळले आहे. रात्रभर आणि बुधवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे, मांजरा आणि रेणा या नद्यांना मोठा पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोठे नुकसान झाले आहे.मोठ्या मेहनतीने कापणी करून राशीसाठी रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. नुकसानीच्या आघातातून उठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande