अवकाळी पावसामुळे डासांच्या प्रादुर्भावाची शक्यता, चंद्रपूरकरांना सतर्कतेचे आवाहन !
चंद्रपूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील काही दिवसात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. अवकाळी पावसात कीटक
अवकाळी पावसामुळे डासांच्या प्रादुर्भावाची शक्यता, चंद्रपूरकरांना सतर्कतेचे आवाहन !


चंद्रपूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

मागील काही दिवसात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

अवकाळी पावसात कीटकजन्य,साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असते,कारण पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते, जे डासांच्या प्रजननासाठी आदर्श वातावरण तयार करते. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी उबतात आणि त्यांची वाढ होते, ज्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.

घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात.

हवामान बदलामुळे विविध आजारांची शक्यता वाढली आहे. ताप, अंगदुखी, डोळे दुखणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छतेची सवय जोपासून डासांची उत्पत्ती थांबवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande