
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा मासोद येथे भेट दिली असता राणा गावंडे विषय शिक्षक हे शाळेत हजर नव्हते तसेच त्यांच्याबद्दल पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. सातत्याने सुट्टीवर जाणे वर्ग अध्यापनाची काम न करणे अशा अनेक तक्रारी गावकऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या .त्या अनुषंगाने त्यांनी सदर शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष शहानिशा केली व राणा गावंडे यांना निलंबित केले. राणा गावंडे यांची मूळ शाळा ही बोरगाव धर्माळे ही आहे .तेथे देखील त्यांच्याविरोधात विद्यार्थी व गावकऱ्यांच्या खूप तक्रारी होत्या .शाळेत न येणे विद्यार्थ्यांना न शिकवणे वारंवार सुट्टीवर जाणे त्यामुळे त्यांची प्रतिनियुक्ती ही जिल्हा परिषद शाळा इंधला येथे देण्यात आली होती. तेथे देखील त्यांच्या खूप तक्रारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या .त्यामुळे पुन्हा त्यांना जिल्हा परिषद शाळा लोणटेक पंचायत समिती अमरावती येथे तात्पुरती प्रतिनिधी देण्यात आली होती. तिथे देखील ते व्यवस्थित काम करू शकले नाही विशेष म्हणजे त्या शाळेवर त्यांच्या पत्नी देखील कार्यरत होते. सातत्याने वादाच्या मोहरत असलेले राणा गावंडे यांना वारंवार शाळा बदल करून द्यावा लागतच असे हे वादग्रस्त व्यक्तिमत्व अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकत्याच त्यांचा निलंबनाचा आदेश करून त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे. राणा गावंडे शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत असे असताना ते सामान्य सभासदांचे ंचे प्रश्न कसे सोडवतील असा प्रश्न निर्माण झाला आहे .तसेच त्यांच्या विसंगत भूमिकेमुळे सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. नुकतेच त्यांनी शिक्षक बँकेच्या अध्यक्षाच्या दालनावर आपला राजीनामा चिपकवला आहे .सदर राजीनामा मध्ये त्यांनी बँकेमध्ये होत असलेला भ्रष्टाचाराचे कारण नमूद केले आहे .विशेष म्हणजे राणा गावंडे यांनी शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये सर्व ठरावाला मंजुरात दिलेली आहे असे असताना बँकेमध्ये भ्रष्टाचार आहे असे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. निलंबनानंतर त्यांना पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे पदस्थापना देण्यात आली आहे .आता त्यांच्या डिपारमेंटल इन्क्वायरी मध्ये काय तथ्य बाहेर येते व ते शिक्षक म्हणून कायम राहतात की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी