शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे त्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे - राज्यपाल हरीभाऊ बागडे
सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। “समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवनापासूनच सुरू झाले पाहिजे आणि या प्रक्रियेत पत्रकारांनी सक्रिय योगदान द्यावे,” असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल मा. हरीभाऊ बागडे यांनी केले. पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया व व्ही ओ एम न
शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे त्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे - राज्यपाल हरीभाऊ बागडे


सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।

“समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवनापासूनच सुरू झाले पाहिजे आणि या प्रक्रियेत पत्रकारांनी सक्रिय योगदान द्यावे,” असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल मा. हरीभाऊ बागडे यांनी केले. पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया व व्ही ओ एम नॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते.कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख संदीप काळे, उद्योजक राणा सूर्यवंशी, वरिष्ठ पत्रकार संजय आवटे,इस्कॉन पंढरपूर अध्यक्ष प्रल्हाद प्रभू, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, इस्कॉन सिकंदराबादचे अध्यक्ष सहदेव प्रभू यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पत्रकार उपस्थित होते.

राज्यपाल बागडे यांनी भारतीय संस्कृतीच्या नैतिक मूल्यांचा गौरव करताना सांगितले की, “प्राचीन व मध्ययुगीन इतिहासकार, अभ्यासक आणि परकीय प्रवासी यांच्या लेखनातून भारतीय संस्कृती समृद्ध आणि नैतिक मूल्यांनी युक्त होती. इंग्रजांनी 1835 मध्ये गुलामगिरी निर्माण करणारी शैक्षणिक पद्धती आणून या मूल्यांवर घाला घातला. मात्र, 2020 पासून केंद्र शासनाने शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करून नवसंस्कारित दिशा दिली आहे.

”पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना त्यांनी नारद मुनी यांचा उल्लेख ‘पहिले पत्रकार’ म्हणून केला आणि सांगितले की, “राष्ट्र, राज्य, शहर आणि गावाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी काम केल्यास समाजात सकारात्मक बदल घडतो.”

राज्यपालांनी प्रसारमाध्यम क्षेत्रातील विविध उदाहरणांचा दाखला देत पत्रकार समाज सुधारण्याच्या कार्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात याचे विवेचन केले. त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे उदाहरण देत प्राचीन भारतातील संशोधन वृत्ती आणि शिक्षणपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजांच्या काळात गव्हर्नर मेकॉले यांच्या शैक्षणिक धोरणामुळे भारतीय मूल्यांवर परिणाम झाला, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande