
बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)।
बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत
राष्ट्रवादी भवन, बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विजयी तसेच पराभूत अशा सर्व उमेदवारांची संयुक्त बैठक पार पडली.
यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले की,
निवडणूक प्रक्रियेत जय-पराजय हा लोकशाहीचा भाग असतो.
म्हणून कोणताही निकाल असो, उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी खचून न जाता जनतेसाठीचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, असे स्पष्ट आणि सकारात्मक आवाहन यावेळी करण्यात आले.
आजची बैठक ही आत्मपरीक्षणाची, नव्या रणनीतीची आणि पुढील संघर्षासाठी सज्ज होण्याची दिशा ठरली. संघटन मजबूत करून, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत राहणे हीच भूमिका, हीच बांधिलकी! असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis