भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली – हर्षवर्धन सपकाळ
चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्ह
भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली – हर्षवर्धन सपकाळ


चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटले की, देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले. रस्ते नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही मात्र भ्रष्टाचार मात्र सर्वत्र आहे. भाजपने चंद्रपूरला विकास नव्हे तर दुर्दैव दिले आहे.म्हणून आपण या षडयंत्रीत भाजपला धडा शिकवून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

आयोजित सभेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आ . सुधाकर अडबाले, माजी आमदार सुभाष धोटे,माजी मंत्री वसंत पुरके, विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, संतोषसिंह रावत, शिवा राव,प्रमोद बोरीकर, हे स्थानिक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांचेसह लावणी कलावंत गौतमी पाटील व चंद्रपूर महानगर पालिका निवडणूकितील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व प्रभागाचे उमेदवार मंचावर उपस्थित होते.

यावेळी सभेला संबोधित करतांना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत भाजपचा समाचार घेतला. देश व राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला.यामुळे महागाई व बेरोजगारी वाढली. गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. हे सत्तेतील भाजपचे पदाधिकारी आता शासन नियमावलींना पायदळी तुडवत असून याचा प्रत्यय भाजपचा माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार याने शहरातील गोरगरीब जनतेच्या भावनेशी खेळ करून बोगस पट्टे वाटप केल्याच्या प्रकारातून पुढे आला. असे सांगितले.

तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या महिला-विरोधी धोरण, महिला अत्याचार, व देशात लोकशाहीची होणारी गळचेपी या मुद्द्यांवरून भाजपाला घेरले. तर माजी मंत्री वसंत पुरके यांनी भाजपच्या फसव्या आश्वासनांचा पर्दाफाश करत निवडणूक आली की मोठमोठी स्वप्ने दाखवायची आणि सत्ता मिळाल्यावर जनतेकडे पाठ फिरवायची—हा भाजपचा जुना खेळ आहे. चंद्रपूरला आता लुटारू नव्हे, तर जनतेचे सेवक हवेत असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande