
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) | पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्यात पूर,दरड कोसळणे, वीज खंडित होणे किंवा इतर कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. ते असे :
जिल्हा स्तरावरील आपत्कालीन संपर्क क्रमांक -
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष : 02352-222233 /7057222233
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष : 02352-222222 / 112 (टोल फ्री)
महावितरण (वीज तक्रारी) : 7875765018
वन विभाग, रत्नागिरी : 9096578761 / 1926
सार्वजनिक बांधकाम विभाग : 02352-223505
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी : 02352-223570
तालुकानिहाय तहसील कार्यालयांचे संपर्क क्रमांक :
रत्नागिरी: 02352-223127
लांजा: 02351-230024 / 8087624324
राजापूर: 02353-222027
संगमेश्वर: 02354-260024
चिपळूण: 02355-252044 / 9673252044
खेड: 02356-263031
दापोली: 02358-282036
गुहागर: 02359-240237
मंडणगड: 02350-225236
कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी