
बीड, 12 जुलै (हिं.स.)।
GVT आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून बीड जिल्हा जल, वृक्ष आणि अर्थसमृद्धीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. सिरसाळा येथे जलनायक मयंक गांधी, जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन व मान्यवरांच्या उपस्थितीत 'जलवृक्ष समृद्ध अभियान' उत्साहात संपन्न झाले. जलसंधारण, मृदासंधारण, वृक्षसंवर्धन आणि मनसंवर्धनाच्या बळावर शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत आर्थिक समृद्धी घडविण्याचा नवा संकल्प यावेळी दृढ झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis