
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। कळंबच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी १० नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत भाजपा परिवारात जाहीर प्रवेश केला.
प्रवेशानंतर जिल्हा परिषदेत अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सर्व नगरसेवकांची भेट घेऊन मनमोकळा संवाद साधला. विकासाभिमुख नेतृत्व, जनसेवेची बांधिलकी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis