
चंदीगड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। देशभरातील तुरुंगात बंदिस्त शीखांची सुटका तसेच माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला जगतार सिंह हवारा याच्या पॅरोलची मागणी करणाऱ्या कौमी इंसाफ मोर्चाच्या आवाहनावरून शुक्रवारी पंजाबमध्ये बंदचा व्यापक परिणाम पाहायला मिळाला. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या बंदमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
कौमी इंसाफ मोर्चाचे मुख्य केंद्र मोहाली आहे. येथे वर्ष 2023 पासून वायपीएस चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. इंसाफ मोर्चाच्या आवाहनावरून पंजाब बंददरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी बाजारपेठा उघडल्या नाहीत. मोहालीला लागून असलेल्या डेराबस्सी तसेच लालडू येथे बंदचा व्यापक परिणाम पाहायला मिळाला. येथे बाजारपेठ तसेच भाजी मंडई आदी पूर्णपणे बंद आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील बहुतांश खासगी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
बसस्थानकांमधून बसेस बाहेर येऊ दिल्या जात नाहीत. बंदला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मोहालीमध्ये विमानतळ मार्गावर तसेच वायपीएस चौकात निहंगांनी मोर्चा सांभाळला आहे. येथे नियमित कामावर जाणाऱ्या लोकांना अडवण्यात आल्याने जोरदार गोंधळ झाला. पठाणकोट, लुधियाना, जालंधर तसेच अमृतसरमध्येही बंदचा व्यापक परिणाम पाहायला मिळत आहे. येथे बसस्थानकांबाहेर धरणे दिले जात आहे.
कौमी इंसाफ मोर्चाचे समर्थक ठिकठिकाणी जाऊन दुकाने बंद करून घेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्ग रोखण्यात आले आहेत. खरड-चंदीगड महामार्गावर आंदोलनादरम्यान एका युवकाला अडवण्यात आले. युवकाचे म्हणणे होते की त्याला पेपर देण्यासाठी पुढे जायचे आहे. आंदोलनात उपस्थित लोकांचा आरोप होता की युवक एका कंपनीचा एमआर आहे. आंदोलकांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता तो संतप्त झाला. पठाणकोटमध्ये पंजाब बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule