
जळगाव , 24 ऑगस्ट (हिं.स.) | थोर कवयित्री आणि लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या जळगाव महानगरच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) आणि भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या सहज, ओघवत्या आणि ग्रामीण बोलीतील कवितांमधून मराठी साहित्याला समृद्ध केले. जळगावच्या मातीतून उमटलेला त्यांचा साहित्यिक आवाज आजही वाचकांना प्रेरणा देतो. त्यांच्या साहित्यामधून ग्रामीण जीवन, संस्कार, नातेसंबंध आणि मानवी मूल्यांचे प्रभावी दर्शन घडते. जयंतीनिमित्त उपस्थितांनी बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाला उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर