मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा; अधिकाऱ्यांना धारेवर धरले
रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांकडून क
Aaditya Thackeray reviews Mumbai-Goa highway work; pulls up officials.


ठाकरे


रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांकडून कामाची सद्यस्थिती जाणून घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र विविध ठिकाणी सुरू असलेली कामे, रखडलेले प्रकल्प आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी महामार्गाच्या कामाची प्रगती, वाहतुकीची स्थिती आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महामार्गाचे काम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात वेगाने पूर्ण झाले पाहिजे. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. रखडलेल्या कामांना गती देऊन प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक उपलब्ध करून देण्याची गरजही त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महामार्गाच्या कामातील अडचणी आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande