पुढाऱ्यांची किंवा उद्योगपत्यांची मुले सैन्यात नाहीत-इंदोरीकर महाराज
अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांची मुलं ही आर्मी मध्ये, समाजसेवा, देशसेवा करणाऱ्या नोकरीमध्ये आहेत. मात्र कोणत्याही मोठ्या उद्योगपत्याचा किंवा पुढाऱ्याचा मुलगा आर्मीमध्ये किंवा समाजसेवेच्या नोकरीत नाही. आणि जाणारही नाही, असा टोला नामवंत कीर्
P


अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांची मुलं ही आर्मी मध्ये, समाजसेवा, देशसेवा करणाऱ्या नोकरीमध्ये आहेत. मात्र कोणत्याही मोठ्या उद्योगपत्याचा किंवा पुढाऱ्याचा मुलगा आर्मीमध्ये किंवा समाजसेवेच्या नोकरीत नाही. आणि जाणारही नाही, असा टोला नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अकोल्यातील मूर्तिजापूर येथे आयोजित कीर्तनात लगावला आहे.

आपल्या कीर्तनातून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा विविध विषयांवर परखड पणे मत मांडणारे नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अकोल्यातही राजकीय नेत्यांवर सडकून प्रहार केला आहे. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर स्वराज फक्त शेतकाऱ्याच्याच मुलांनी टिकवल्याचा घणाघातही इंदुरीकर महाराजांनी केला आहे. जिथं जिथं संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं शेतकऱ्यांची मुलं आहेत, मोठ्यांची नाहीत ते फक्त आपल्याला म्हणतात विकासाच्या दृष्टीने भरीव कामे करायची आहेत. असा टोलाही नेत्यांना लगावला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे भाष्य केले. ते म्हणाले, मोबाईलने समाजाचे वाटोळं केलं आहे. तर गावातील पुढाऱ्यानी आठवड्यातून एक दिवस तरी शाळेला भेट द्यायला पाहिजे पण ते देत नाहीत. राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांनी केली आहे. शाळेत शिक्षकांच्या मोबाईलच्या वापरामुळे शाळांमधील मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचा दावा इंदुरीकर महाराज यांनी केला आहे. त्यामुळे रोज शाळेच्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या वेळेत शाळेत मोबाईल बंदी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. अकोल्यात कीर्तनात त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. पुढाऱ्यांचा प्रचार केला तर कोणी देणार नाही, बीएससी, एमएससी झालेली मुलं 10 हजार रुपये महिन्याने आहेत, काय होत दहा हजारात असा सवालही इंदुरीकर महाराजांनी केला आहे. आम्ही तुमचा प्रचार तर तुम्ही आमचा विचार करायचा, शिक्षणात शिकलेल्या लोकांचा ह्या लोकांनी युज अँड थ्रो असा वापर केल्याचा आरोपही इंदुरीकर महाराजांनी केला आहे. इंदुरीकर महाराजांनी स्वतःबद्दल सांगत पुढं म्हणाले 96 कुळी रक्त आहे म्हणून वाकायची सवय आहे मोडायची नाही, मला बूट पॉलिश करायची सवय आहे, बूट चाटून जगायची सवय नाही. मला सगळं विकायची सवय आहे पण स्वाभिमान विकायची सवय नाही, या तीन गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल्याच त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला काय तुम्ही रोजाने सभेत जाणारी माणसं असा टोलाही इंदुरीकर महाराजांनी लागवलाय, पण इथून पुढं फुगिर व्हा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande