लातूर ते मुंबई... आता फक्त ४.५ तासांत! मराठवाड्याच्या प्रगतीला मिळणार 'सुपरफास्ट' गती!
लातूर, 14 डिसेंबर (हिं.स.)। ​महाराष्ट्राचे ''इन्फ्रामॅन'' आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कल्याण-लातूर द्रुतगती महामार्गाला (Expressway) तत्वतः मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे लातूर आणि म
लातूर ते मुंबई... आता फक्त ४.५ तासांत! मराठवाड्याच्या प्रगतीला मिळणार 'सुपरफास्ट' गती!


लातूर, 14 डिसेंबर (हिं.स.)।

​महाराष्ट्राचे 'इन्फ्रामॅन' आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कल्याण-लातूर द्रुतगती महामार्गाला (Expressway) तत्वतः मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे लातूर आणि मुंबईमधील अंतर आता अवघ्या ४:३० तासांत पार करणे शक्य होणार आहे.

​या महामार्गाचे वैशिष्ट्ये आणि फायदे:

​प्रचंड वेग: ४४२ किमी लांबीचा हा मार्ग प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी करणार.

​उद्योगांना बळ: मराठवाड्यात नवीन गुंतवणुकीचे व व्यापाराचे दरवाजे उघडणार.

​शेतकऱ्यांचा फायदा: शेतीमाल थेट मुंबईच्या बाजारपेठेत जलद गतीने पोहोचणार.

​रोजगार संधी: स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होणार.

वेळेची व इंधनाची बचत: प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि स्वस्त होणार.

​हा केवळ रस्ता नाही, तर लातूरच्या समृद्धीचा नवा महामार्ग आहे! विकासाची ही 'विमान झेप' लातूरच्या भविष्याला नवी दिशा देणारी ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande