पिंपरी चिंचवड निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
पिंपरी, 21 डिसेंबर (हिं.स.)पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी २०२६ रोजी या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष
पिंपरी चिंचवड निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न


पिंपरी, 21 डिसेंबर (हिं.स.)पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी २०२६ रोजी या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडले.

तीन टप्प्यात पार पडलेल्या या प्रशिक्षण सत्रास अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, निवडणूक निर्णय अधिकारी हणुमंत पाटील, दिप्ती सुर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र कुलकर्णी, प्रविण ढमाले, निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य प्रशिक्षक नरेंद्र बंड, रामेश्वर पवार, शिवाजी लाटे तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर रुजू होण्याआधी मतदान प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि इतर कर्मचारी मतदान केंद्रांवर नियुक्त झाल्यानंतर त्यांना सर्व अधिकार प्राप्त झालेले असणार आहे, त्यामुळे या प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊन नये म्हणून प्रशिक्षणादरम्यान सर्व शंकांचे निरसण करून घ्यावे आणि वेळोवेळी आयोजित केले जाणाऱ्या प्रशिक्षण सत्रांना उपस्थित रहावे, असा सूचना अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

या प्रशिक्षण कार्यक्रमात विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व अधोरेखित केले. मतदानाच्या दिवशी कामकाजात कोणताही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडथळा येऊ नये, यासाठी प्रशिक्षणादरम्यानच सर्व शंकांचे निरसन करून घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून जबाबदारीने काम करावे आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी हातभार लावावा असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande