अहिल्यानगर दि. 12 मार्च (हिं.स.) :- यशवंतराव चव्हाण हे एक जाणते आणि बहुआयामी नेतृत्व होते. शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, संस्कृती इ. क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळा त केले आहे. प्रखर राष्ट्रभावना, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मुल्यांवरील विश्वास,इ. विविध पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्व बहरले होते, यशवंतराव अजातशत्रू राजकारणी होते, असे प्रतिपादन सासवड येथिल वाघिरे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख आणि यशवंतराव चव्हाण यांचे चरित्रकार डॉ. नानासाहेब पवार यांनी केले.
स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या ११२ व्या जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण व्यासपीठ, अहिल्या नगर,व न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्रजी दरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव जयंतजी वाघ प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, अॅड. सुभाष भोर, प्राचार्य. डॉ. झावरे. बी. एच. यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यशवंतराव समजून घेत असतांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील त्यांची वैचारिक जडण-घडण समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आई विठाईने त्यांच्या अंगि बाणविलेल्य करारी बाण्या विषयीचा प्रसंग देखिल त्यांनी आपल्या मनोगतात उधृत केला. यशवंतरावांचे सहकार, उद्योग, शिक्षण,इ. क्षेत्रांबाबतचे धोरण, बाबा कल्याणी, शंतनू किर्लोस्कर,इ. उद्योजकांना केलेली मदत, त्यांचे भाषाप्रभुत्व, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष मंडळ आदिंची केलेली निर्मिती,इ विविध पैलूंवर त्यांनी आपल्या मनोगतात प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्य सुरुवातीला प्राचार्य. डॉ. बाळासाहेब सागडे यांनी स्वागत केले तसेच व्यासपीठचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे यांनी प्रास्ताविक करून व्यासपीठाच्या स्थापने मागील हेतू विषद केला. डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितले कि स्व: रामनाथजी वाघ यांनी २५ वर्षापुर्वी स्थापन केलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातुन शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातुन समाज प्रबोधनाचे काम करीत आहे. बहुजन समाजातील, विशेषत: ग्रामिण भागातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणेसाठी व्यासपीठाच्या माध्यमातुन काम करण्याचे स्व: वाघ साहेब यांचे स्वप्न होते. यशस्वी सनदी अधिकाऱ्याना व्यासपीठाच्या वतीने आमंत्रित करून विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्याचे काम व्यासपीठ करीत आहे.अॅड. विश्वासराव आठरे पाटील यांनी आपल्या मनोगतात यशवंतरावांच्या शिवनेरी किल्ल्यावरील भाषणाचा दाखला दिला. त्याचबरोबर स्व. खासदार चंद्रभान आठरे पाटील यांना यशवंतरावांचा खासदारकीच्या तिकिटासाठी आलेला फोन व त्यानंतरच्या सर्व घडामोडींच्या स्मृती जागविल्या. त्याचबरोबर बहुजनांच्या शिक्षणासाठी यशवंतरावांनी घेतलेले निर्णय, यशवंतराव व प्र. के. अत्रे यांच्यातील घडलेला प्रसंग, याप्रसंगी त्यांनी सांगितले.आयुक्त यशवंत डांगे यांनी यशवंतरावांनी घेतलेला ई.बि.सी सवलतीचा निर्णय, उजनी, कोयना धरणांची केलेली पायाभरणी, देशात सर्वप्रथम राबविलेली पंचायत राज व्यवस्था, रोजगार हमी कायदा, कसेल त्याची जमिनचा कायदा आदी निर्णयांची माहिती दिली. कराड येथिल साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणाचा संदर्भ देखिल त्यांनी दिला. त्याबरोबरच विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कसा अभ्यास करावा याची माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रामचंद्र दरे म्हणाले कि पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेच्या धर्तीवर अहमदनगरमध्ये यशवंत व्याख्यानमाला सुरू करण्याचे मोठे काम स्वर्गीय रामनाथ वाघ यांनी केले. त्यांचा पश्यात व्यासपीठाच्या माध्यमातून ही काम आज ही सुरू आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्याना आणि शहरातील नागरीकांना साहितीक व्याख्यानचा लाभ होत आहे याचा आनंद वाटतो.या वेळी त्यांनी व्यासपीठातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘ युगप्रर्वतक यशवंतराव’ या ग्रंथाच्या निर्मिती मागिल इतिहास कथन केला, यशवंतरावांना विविध लेखकांनी व वक्त्यांनी दिलेल्या विशेषणांचे वाचन केले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni