नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.)।
पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे फेरबदल करण्यात येण्याची
शक्यता आहे. संघव्यवस्थापन आणि निवड समितीने पाकिस्तानच्या तीन अनुभवी क्रिकेटपटूंचा
टी-२० संघात समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबर आझम, रिझवान आणि शाहीन
आफ्रिदी या क्रिकेटपटूंना टी-२० च्या संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल.
पाकिस्तानला आगमी काळात वेस्ट इंडिज आणि
बांग्लादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी या अनुभवी
क्रिकेटपटूंचा विचार केला जाणार नाही. अशी चर्चा पाकिस्तान क्रिकेट वर्तुळामध्ये
सुरू आहे. नजीकच्या काळात या तिन्ही क्रिकेटपटूंनी केलेली खराब कामगिरी हा कठोर
निर्णय घेण्यासाठी कारणीभूत ठरली आहे.
रिझवानच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेतील टी-२०
मालिकेत पाकिस्तानला ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभूत संघामघ्ये
बाबर आझमही होता. यानंतर रिझवान आणि बाबरला न्यूझीलंड आणि बांग्लादेशविरुद्धच्या मायदेशातील
मालिकेतून वगळण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra