चंद्रपूर, 7 जून (हिं.स.)। इरई नदी खोलीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रामसेतू ते चौराळा पूल दरम्यान 2400 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. यात 70 टीसीएम गाळ उपसा करण्यात आला असून 118 शेतकर्यांना 17 हजार ब्रास गाळ वाटप करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 10 पोकलेन, 25 ट्रॅक्टर, 22 टिप्पर कार्यरत आहेत. दुसऱ्या टप्प्यात या यंत्र सामुग्रीसह अतिरिक्त यंत्र सामुग्री वाढविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. दरम्यान चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव