छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (हिं.स.)।परळीतील मुंडे कुटुंबीयांना न्याय कधी देणार असा सवाल शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे.स्थानिक बीडमधील गुंड, पुढारींसमोर आपण झुकताय का असाही सवाल त्यांनी केला.
परळीतील महादेव मुंडे यांची हत्याकाडाला जवळपास २३ महिने उलटून गेले. अद्याप आरोपी पकडण्यात काहीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
गेल्या महिन्यात मुंडे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मला भेटून खरी वस्तुस्थिती सांगितली. मुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत ३१ जुलैला एसआयटी स्थापन केली, त्यानंतर काहीच कारवाई नाही.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis