
डोंबिवली, 08 जानेवारी (हिं.स.)।
एमआयडीसी निवासी विभागात अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात उभे टाकले आहेत. सुपर मार्केट समोर मुख्य रस्त्याचा कडेला असलेल्या नाल्यात कचऱ्याचा आणि प्लास्टिकचा थर जमा झाला असून नाला कचरा, प्लास्टिकने भरल्याने सांडपाणी, पाणी वाहिनी फुटली असल्याचे समोर येत आहे.
सदर सांडपाणी नाल्यातून कसल्यातरी पाण्याचा बुडबुडा, फवारा येऊन त्यात मिसळत असल्याचे दिसत आहे. ही बाब गेल्या कित्तेक दिवसांपासून सुरु असून या रस्त्यावरून रोजच प्रशासनाचे अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जात असतात. या नाल्याची साफसफाई करून त्यातून येणारा पाण्याचा फवारा हा कसला आहे हे शोधून पाहण्याची कोणालाच आवश्यकता भासत नाही. याच नाल्याच्याकडेला अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान बसाविले असून त्यांचा कचरा पण याच नाल्यात पडत असावा अशी शंका आहे. या फेरीवाल्यांना हटविले जात नाही. आता सर्व लोकही उदासीन झाले असल्याचे दिसत असून आपले काम बरे बाकी काही होवो अशी जनतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासन हे एकमेकांकडे बोट दाखवून फक्त नोटीस देण्यापलीकडे काहीही करीत नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे सांगत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi