
अहमदाबाद, 21 फेब्रुवारी (हिं.स.)२०२६ च्या टी२० विश्वचषकाचा गट टप्पा संपला आहे. आता सुपर एटच्या गट १ मध्ये असलेला भारत आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सुपर ८ सामना जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या फॉर्मबद्दल उघडपणे चर्चा केली.
टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यात खाते न उघडता बाद झाला आहे. त्याने सध्याच्या स्पर्धेत एकही धाव काढली नाही. सुपर ८ च्या आधी कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याच्या फॉर्मबद्दल विचारले असता तो म्हणाला, अभिषेकच्या फॉर्मबद्दल काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते. गेल्या वर्षी अभिषेकने आमच्यासाठी कव्हर केले आणि आम्ही या स्पर्धेत त्याच्यासाठी कव्हर करू.
चार गट टप्पा सामन्यांमध्ये १०६ धावा काढणाऱ्या तिलक वर्मालाही अद्याप मोठी खेळी खेळता आलेली नाही. त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, तिलकला एका विशिष्ट पद्धतीने फलंदाजी करण्यास सांगण्यात आले आहे. जर एक विकेट पडली तर तो एका विशिष्ट पद्धतीने फलंदाजी करू शकतो, त्याचे शॉट्स खेळू शकतो. पण जर दोन विकेट पडल्या तर त्याला थोडा वेळ घ्यावा लागेल. तिलकाच्या फॉर्मबद्दल कोणतीही चिंता नाही.
कर्णधाराने भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला, मला माझ्या गोलंदाजांवर अभिमान आहे. म्हणून, जर आपण १७० ते १८० च्या सामन्यात अडकलो तर मला माझ्या गोलंदाजांवर विश्वास आहे की, ते आपल्याला सामना जिंकून देतील. एक काळ असा होता जेव्हा मला कधीच वाटले नव्हते की आपण २३० ते २४० धावा करू शकू. कर्णधार पुढे म्हणाला, आम्हाला फक्त प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्ला करणारा संघ बनायचे नाही. आपल्याला ७ ते १५ (षटकांच्या) दरम्यान देखील चांगले क्रिकेट खेळावे लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे