
लातूर, 30 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पातून १६.२६ घनमीटर पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.
रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, रेणापुर व खरोळा बंधारा शेजारील शेतक-यांनी सिंचनासाठी रेणापूर मध्यम प्रकल्पातून बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेवून प्रकल्पाच्या गेट क्र १ व गेट क्र ६ मधून पाणी सोडण्याची सुरूवात करण्यात आली. सध्या प्रकल्पात ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आज सोडण्यात आलेल्या पाण्याने घनसरगाव, रेणापुर, जवळगा व खरोळा हे चार बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत. चार बंधारे भरण्यासाठी ८ टक्के पाणीसाठा सोडावा लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पात ५९% टक्के पाणी साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis