रत्नागिरीत २९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभ
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरीत येत्या २९ सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या राज्यभरात
रोजगार महाकु्ंभ क्यूआर


रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरीत येत्या २९ सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी उपलब्ध करून दिलेला QR Code स्कॅन करून तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

या रोजगार महाकुंभासाठी उद्योग, नामांकित कंपन्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), मोठ्या आस्थापना तसेच सेवा क्षेत्रातील रोजगारदात्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. रिक्त पदांची संख्या, पदनिहाय पात्रता आणि आवश्यक कौशल्यांची निश्चिती करून जास्तीत जास्त कंपन्यांना या मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे.

आयटीआय (ITI), कौशल्य प्रशिक्षण केंद्रे, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच जिल्हा रोजगार कार्यालयांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे. यामध्ये महिला, दिव्यांग, ग्रामीण युवक आणि अल्प उत्पन्न गटातील उमेदवारांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

मेळाव्यापूर्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास (Personality Development), संभाषण कौशल्य (Soft Skills), रेझ्युमे लेखन (Resume Writing), मुलाखत कौशल्य (Interview Skills), उद्योगांच्या गरजेनुसार अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण व ओरिएंटेशन यांचा समावेश आहे.

महाकुंभामध्ये पारदर्शक व सुटसुटीत व्यवस्था, मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी, समुपदेशन, कागदपत्र पडताळणी, प्रत्यक्ष मुलाखती, निवड प्रक्रिया आणि ऑफर लेटर वितरणासाठी स्वतंत्र कक्ष उभारले जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर दिल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष जॉइनिंगबाबत नियमित पाठपुरावा (Follow-up) ठेवण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande